yuva MAharashtra मुस्लिम सरदार मलिके रेहांच्या नावानं भरणाऱ्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घाला - मा. आ. नितीन शिंदे.

मुस्लिम सरदार मलिके रेहांच्या नावानं भरणाऱ्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घाला - मा. आ. नितीन शिंदे.


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जून २०२५

विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याच्या भक्तांनी त्याच्या नावानं बेकायदेशीररित्या तीन मजली भव्य दिव्य आरसीसी दर्गा उभा केलेला आहे. दरवर्षी बकरी ईद च्या दरम्यान तीन दिवस त्याच्या भक्तांच्या कडून दर्गामध्ये उरूस भरवला जातो. या उरुसामध्ये हजारो कोंबड्या व बोकड यांचा बळी देऊन हजारो लिटर दारू फस्त केली जाते. आणि हा संपूर्ण गड अपवित्र केला जातो. की जो गड नरवीर बाजी प्रभू देशपांडे व नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे त्यांच्या रक्तांन नाहिलेला आहे. या भरणाऱ्या उरसाच्या विरोधात शिवभक्तांच्या मनात संतापाची लाट आहे. 
      
गेल्या वर्षी या ऊरुसावर कायमस्वरूपी बंदी घाला अशी मागणी केल्यावर सरकारने या उरुसावर बंदी घातली होती. तशी याही वर्षी दि. 6,7,8 या तीन दिवसावर भरणाऱ्या उरुसावर सरकारने कायमस्वरूपी बंदी घालावी. तसेच मलिकरेहानच्या नावाने बांधलेला बेकायदेशीर दर्गा सरकारने जमीन दोस्त करावा व संपूर्ण विशाळगड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा. 


या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवार दिनांक 04/06/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, दत्तात्रय भोकरे, सोमनाथ गोटखिंडे राजू जाधव, प्रकाश चव्हाण, मनोज साळुंखे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, पै.प्रदीप निकम, अरुण वाघमोडे, प्रसाद रिसवडे, रवी वादीवणे, गजानन माने, अरविंद येतनाळे, यांनी केले आहे.