| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ मे २०२५
सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान व काँग्रेस सेवा दलाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज ६१ वी पुण्यतिथी काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले त्या अगोदर जुना स्टेशन चौक येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास सेवा दलाची जिल्हाध्यक्ष अजित ढोले मौलाली वंटमोरेव सौ प्रतिक्षा काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
काँग्रेस भवन येथे प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे जनरल सेक्रेटरी दीपक गायकवाड व शहर जिल्हा सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना पैगंबर शेख प्रदेश संघटक यांनी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष सामाजिक लोकशाहीवादी व लेखक होते 1930 ते 40 या सालामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील ते प्रमुख नेते होते त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सोळा वर्षे काम पाहिले आहे.
यावेळी आपल्या मनोगतात दीपक गायकवाड म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1920 नंतर बॅरिस्टर होऊन आल्यानंतर, राष्ट्रीय राजकारणामध्ये रस घेण्यात सुरुवात केली. ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले. महात्मा गांधी यांनी त्यांना राजकीय वारस म्हणून त्यांची नियुक्ती केली. अशा या थोर महात्म्यास मी ओबीसी संघटनेकडून विनम्र अभिवादन करतो.
यावेळी अजित ढोले यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये भारताला सक्षम बनविले. भारताला अन्नधान्यांमध्ये स्वावलंबन बनवण्यासाठी त्यांनी धरणांची योजना राबविली. नासाची स्थापना त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाली. अशा या कर्तृत्ववान दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या या आदर्श नेत्याला सेवा दलाच्या वतीने विनम्र अभिवादन.
यावेळी श्रीधर बारटक्के, माजी तहसीलदार विवेक अंकलीकर, विश्वास यादव, मुफित कोळेकर, अल्पसंख्यांक सेलचे देशभूषण पाटील, खुदबुदीन मुजावर, अपंग सेलचे सुरेश गायकवाड, नामदेव पठाडे, खतीब मुल्ला, गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने हजर होते.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले. तर शेवटी आभार सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी मानले.