| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ मे २०२५
जन्म मृत्यू प्रलंबित दाखले नियोजनपूर्वक निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त मा सत्यम गांधी यांनी आदेश देऊन मिरज विभागकडील २००० तर सांगली विभागकडील त्या प्रमाणात असलेली प्रलंबित आकडेवारी अधिक कर्मचारी व संगणकाच्या यांच्या मदतीने आणली सध्य स्थितीवर येऊन ४०० पर्यत ही आकडेवारी आली आहे.
मिरज विभागीय कार्यालय मनपा यांच्याकडील जन्म मृत्यू दाखले प्रलंबित संख्या जास्त प्रमाणात होती, ही बाब मा आयुक्त यांनी मिरज येथे भेट दिली असता लक्षात आली होती, त्याच प्रमाणात सांगली येथे देखीलजन्म मृत्यू दाखले प्रलंबित होते. त्यामुळे मा सत्यम गांधी आयुक्त यांनी मिरज विभागाकडे १२ अधिक कर्मचारी तर सांगली विभागाकडे १० कर्मचारी आणि त्यांना आवश्यक असलेले संगणक देखील उपलब्ध करून दिले होते.
आता जन्म मृत्यू दाखले सध्यस्थितीवर येऊन नागरिकांना सत्वर उपलब्ध होणार आहेत,
रोजच्या रोज दाखले दिले जाणार असल्याने नेहमीच्या कर्मचाऱ्यांच्या आधारे कामकाज सुरळीत होणार आहे,
नागरिकांनी जन्म मृत्यू दाखल्याबाबत काही अडचण असल्यास मिरज विभागकडील सहा आयुक्त अनिस मुल्ला आणि सांगली विभागकडील गिरीष पाठक उप निबंधक जन्म मृत्यू विभाग यांच्याशी संपर्क साधावा , अनिस मुल्ला सहा आयुक्त 79721 55733 तर गिरीष पाठक उप निबंधक जन्म मृत्यू 8329765875 या नंबरवर संपर्क साधता येईल,