yuva MAharashtra दोन वेळा पोटभर जेवून सुद्धा स्थूलता आणि मधुमेह रोखता येऊ शकतो -जीवनशैली तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित !

दोन वेळा पोटभर जेवून सुद्धा स्थूलता आणि मधुमेह रोखता येऊ शकतो -जीवनशैली तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ मे २०२५

रविवार दिनांक 4 मे रोजी जीवनशैली व मधुमेह मुक्तीसाठी संशोधन करणारे व महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर डॉ. जगन्नाथ दीक्षित, यांचे सांगलीमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. बदललेली जीवनशैली हेच एकमेव मधुमेह वाढण्याचे मुख्य कारण आहे, व्यायामाची कमतरता आणि आहाराबाबत नसलेली सतर्कता ही मोठी दोन कारणे स्थूलता व मधुमेह वाढण्यासाठी कारणीभूत आहेत, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

मधुमेहापासून मुक्त राहायचे असेल तर दोन वेळा फक्त जेवणे व 45 मिनिटे चालणे या प्रकारची डॉ दीक्षित जीवनशैली आचरणात आणून आपण केवळ तीन महिन्यांमध्ये चांगल्या आरोग्यासाठी मोठा फायदा मिळवू शकतो हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे आणि ते सर्व सांगलीकरांनी आजमावून पहावे, असे आवाहन डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी याप्रसंगी केले. 


विश्रामबाग येथील दांडेकर हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला कार्यक्रमासाठी सांगलीच्या नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी डॉ दीक्षित अभियानातील एक कार्यकर्ते चिंतामणी बोडस यांनी आपल्या 92 हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ शार्दुली तेरवाडकर यांनी त्यांच्या दवाखान्याची जागा सांगलीच्या मधुमेह मुक्ती केंद्राला मोफत वापरण्यासाठी दिल्याबद्दल डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्नेहा चौंदीकर यांनी केले, स्वागत सौ भावना शहा, प्रास्ताविक श्रीरंग केळकर यांनी केले. व सौ माधुरी दांडेकर यांनी आभार मानले. 

अतिशय नेटकेपणाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास डॉक्टर सतीश परांजपे, सौ नीता केळकर, ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन श्रीरंग केळकर, सौ प्रतिभा पाटील, चंद्रकांत मोहिते सौ मेघना भिडे, अलका अट्टल सारंग केळकर, मिलिंद लिमये , योगेश सहस्रबुद्धे यांनी केले.