| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २८ मे २०२५
देशाच्या विविध क्षेत्रात अपवादात्मक योगदान देणाऱ्या ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मंगळवारी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या भव्य समारंभात महाराष्ट्रातील सहा व्यक्तींचा समावेश होता.
या पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्रातील सहा मान्यवरांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार स्वीकारले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक जीवनातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले. हा मानाचा पुरस्कार त्यांच्या सुपुत्र उन्मेश जोशी यांनी स्वीकारला.
डॉ. जोशी यांचे राजकीय कारकिर्दीतील योगदान अत्यंत व्यापक होते. त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या. 1995 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर, 2002 ते 2004 दरम्यान ते लोकसभा अध्यक्षपदावर होते. रायगड जिल्ह्यातील नांदवी गावातील या नेतृत्वाने शिक्षण, शिस्त आणि कार्यक्षमतेद्वारे एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांना देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
पद्मश्री पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील अन्य मान्यवर:
अभिनेते अशोक सराफ,
कॅलिग्राफी कलाकार अच्युत पालव,
शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे — यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी
सुभाष शर्मा — कृषी क्षेत्रातील कार्यासाठी
डॉ. विलास डांगरे — वैद्यकीय सेवेतल्या योगदानासाठी
या सहाही व्यक्तींना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले.