yuva MAharashtra लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या सहकार्यातून संभाव्य पूर परिस्थितीसाठी सज्ज - मा सत्यम गांधी

लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या सहकार्यातून संभाव्य पूर परिस्थितीसाठी सज्ज - मा सत्यम गांधी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ मे २०२५

मान्सूनपूर्व आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आलामी आहे. या वर्षी प्रशासन, नागरिकांचा, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून चांगले नियोजन केले आहे. यंदा अवकाळी पाऊस व मान्सून वेळेत आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोड वर कार्यरत आहे, गेल्या काही वर्षांमध्ये कृष्णा नदीला आलेले महापूर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी, त्या नंतर करावयाची व्यवस्था या बाबत प्रशासनाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढले आहेत, त्या नुसार sop तयार करण्यात आली आहे.

पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळणे आवश्यक होते. त्या बाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे. पूर आल्या नंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, परिणामी प्रशासननावर ताण पडतो ही बाब लक्ष्यात घेऊन पूर बाधित क्षेत्रात पाहणी आणि संबंधितांना सूचना दिल्या आहेत. सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. या वेळी मान्सूनपूर्व तयारी सुरू करून सर्व बाबीची नोंद घेऊन नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासन आता सज्ज असणार आहे.

आपत्ती मित्र अँप, आपत्ती मित्र कार्यकर्ते , निवारा केंद्र, स्थळातरीत नागरिकाच्या सोयी सुविधा, नाले सफाई इत्यादी बाबी बाबत या नियोजन करण्यात आले आहे, जेणे करून पुढील काळात नियोजन नुसार कामकाज करते वेळी प्रशासनावर ताण येणार नाही, याची दक्षता घेतली आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व बाबी विचारपूर्वक होऊन नागरिकांच्या वित्त आणि जीवित हानी होणार नाही, परिस्थिती हाताळताना काळजी घेता येईल, खबरदारी घेण्यात येणार आहे.

मागील अनुभव पाहता पूरबाधित क्षेत्रातील नागरिकाच्या साठी सुरक्षित किट ( बॅग ) तयार ठेवण्याची सूचना देण्यात येत आहे. त्यामध्ये आवश्यक सर्व मौल्यवान वस्तू, साहित्य कागदपत्रे, औषध इत्यादी बाबीचा समावेश असावा, त्याचा उपयोग नागरिकांना या पूर्वी झालेला आहे. या वेळी देखील त्या बाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येत आहे, माध्यमांनी सदरची बाब लक्षात घेऊन व्यापक प्रसिद्धी देण्यास विनंती करण्यात येत आहे. 

पूर ओसरल्यावर करावयाच्या कामा बाबत टप्प्याटप्प्याने करावयाच्या कामा बाबत नियोजन करण्यात येणार आहे, sop तयार असल्याने या वेळी कोणत्याही परिस्थितीत कामकाज चागले आणि दर्जेदार करण्याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत, साथीचे रोग अन्य आजार उद्भवतात त्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.आवश्यक त्या उपाययोजना सह टीम तयार ठेवण्यात येणार आहेत.


मा आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली तत्परतेने कामकाज करण्यासाठी टीम असणार आहे, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, NGO यांच्याशी संवाद आणि संपर्क साधून यावेळी त्यांच्या सहभागातून नदी पात्रातील व पुरबाधित होणाऱ्या वस्त्या मधील नागरिकांची जनजागृती करण्याकडे प्राधान्य असणार आहे, पूर आल्यानंतर लोकांच्या मध्ये होणारी भीती आणि त्या नंतर होणारी धावपळ कमी करण्याकडे कल वाढला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे त्या साठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिली जाणार जात आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व साधनसामग्री अध्यवत ठेवणे, मनुष्यबळ प्रशिक्षित आणि सज्ज ठेवणे इत्यादी गोष्टी या वेळी नियोजनपूर्वक करण्यात येत आहे. 

नदीकाठावरील नागरिकांना आवश्यक त्या सूचना, प्रशिक्षण आणि आपल्या जीविताचे, मालमतेचे आणि साधनसामग्रीचे रक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, प्रसार माध्यम आणि व्हाट्सअप इत्यादी व्दारे अध्यवत माहिती दिली जाणार आहे, सध्यस्थिती बाबत माहिती आणि सूचना या वेळेत दिल्या जाणार असल्याने नागरिक सतर्क आणि जागृत राहतील याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक माहिती नागरिकांना देऊन, नागरिक, कर्मचारी अधिकार यांना प्रशिक्षण देऊन, सर्व बाबी बाबत नियोजन करण्यात आले आहे.

- सत्यम गांधी 
आयुक्त भा प्र से