yuva MAharashtra वीराचार्य पतसंस्थेने वीराचार्य स्मृती इमारत उभारणीची केली पायाभरणी !

वीराचार्य पतसंस्थेने वीराचार्य स्मृती इमारत उभारणीची केली पायाभरणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२५

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सांगली या संस्थेने गेली ३२ वर्षे वीराचार्याच्या समाजकार्याचा विचार जपत, अर्थकारणासह सजग समाजकारण करण्यात अग्रेसर आहे. संस्थेने वीराचार्यांच्या कार्याची स्मृती म्हणून प्रशस्त मुख्यालय इमारत उभारणीचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने अक्षय तृतीयाच्या शुम मुहूर्तावर नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ संस्थेचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव श्री. शशिकांत राजोबा यांचे हस्ते संपन्न झाले. वीराचार्यांचे जेष्ठ बंधू श्री. महावीर कुचनुरे यांनी सपत्नीक अमृत हस्ते भुमिपूजन करण्यात केले.

'इवलेसे रोप लावियले, दारी तयाचा वेलू गेला गगनावरी' स्व. बाबासाहेब कुचनुरे या महामानवाच्या चिरंतन स्मृतिप्रत्यर्थ सन १९९३ मध्ये या अर्थसंस्थेचे बीजांकुरण सांगली जिल्ह्याच्या सुजलाम सुफलाम भूमीत झालं आणि आज ३२ वर्षाच्या कालावधीत हे बीज रुजलं, अंकुरलं, बहरलं, फोपावलं एवढच नव्हे तर त्याचा वटवृक्ष होऊन जनसामान्यांचा तो आधारवड ठरत असल्याचे वास्तव म्हणावे लागेल, संवर्धित सहकाराला संस्कार स्पर्श देत विधायक अर्थकारणाच्या माध्यमातून केलेली निरंतर तीन दशकाहून अधिक वर्षाची वाटचाल ! प्रत्येक वर्षागणिक प्रगतीची, विकासाची, समृद्धीची, संपन्नतेची, नियोजनाची, सेवेची, स्थैर्याची, कार्यक्षमतेची, सक्षमतेची, प्रशंसेची खूण गाठ ठरणारी कामगिरी असे संस्था जीवन वाटचालीतील सन्मानाचे, गौरवाचे, संपन्नतेचे, आत्यंतिक आनंदाची अनुभूती देणारे क्षण आहेत!


वीराचार्य पतसंस्थेचा विस्तार त्याला फुटलेले अर्थ विकासाचे घुमारे आणि त्यातून उजळून निघालेले जनसामान्याचे विश्व ही एक तेजस्वी दीपमाळ आहे. वीराचार्य पतसंस्थेने सोडलेल्या सर्व संकल्पची 'संकल्प पूर्ती होताना दिसते आहे. स्वप्नवत वाटणारी उद्दिष्ट साक्षात सत्यात येताना दिसत आहेत. त्यातूनच आज संस्था स्थापनेच्या प्रारंभीच्या १० बाय १० च्या तळघरातील एका खोलीपासून सुरू झालेला संस्थेचा प्रवास ११ स्व मालकीच्या शाखा वास्तूसह संस्मरणीय ठरतो आहे, प्रशस्त अशा ६००० चौरस फुटातील निर्माणाधीन सांगली येथील मुख्य कार्यालयीन वास्तूचा पायाभरणी समारंभाचा क्षण म्हणजे 'सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा धनु' असा ठरतो आहे. नवनिर्माणाधीन मुख्य कार्यालयीन वास्तू म्हणजे संस्थेच्या कार्यक्षमतेची, स्थैर्यची, भक्कमतेची, अनुभूती म्हणावी लागेल. या नवनिर्माणाधीन वास्तूचा पायाभरणी ही केवळ साळी सिमेंटच्या माध्यमातून होत नसून ती संस्थेच्या सेवा मूल्याची, ग्राहकांच्या विश्वासहरतेची, वीराचार्यांच्या विचारधारेची, सेवा संस्काराची, मूल्याधिष्ति, सेवाधिष्टीत, समाजाधीश्चत कार्यप्रणालीची सेवा मूल्याची पायाभरणी म्हणावी लागेल,

कोणत्याही अर्थसंस्थेचा प्रवास हा आपल्या ग्राहक हितचिंतक मार्गदर्शक यांच्या साक्षीने, साथीने, सहयोगाने निरंतर सुरू असतो अशावेळी ग्राहक हिताला प्राधान्यक्रम देऊन त्यांना अत्याधुनिक सर्व प्रकारच्या सुख सुविधा प्रशस्त अश्शा कार्यालयीन वास्तूतून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ही नवनिर्माणधीन वास्तू, होय! ही वास्तू केवळ कार्यालयीन इमारत एवढीच माफक संकल्पना नसून ते वीराचार्यांचे स्मृति मंदिर, सहकार वेदी अशाप्रकारची आमची पराकोटीची उदात उन्नत भावना आहे त्यामुळे सामाजिक संवेदना, सामाजिक बांधिलकी, ग्राहक उत्तरदायीत्वाचे विस्मरण होणार नाही, स्मृतीचा कृतीचा सेवेचा मुद्दा हरवणार नाही, अशा प्रकारचे आश्वासक अभिवचन संचालक मंडळाकडून देत असताना पतसंस्थांच्या वाटचाली संदर्भात एका विचारवंताच्या विचाराची प्रचिती यावी असे वाटते ती अशी' चांगला उत्तम व मंगल विचार हा स्वमनाचा उत्कृष्ट आविष्कार असतो 

चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं जीवनाच्या वाटेवर पायाने चालणारे केवळ अंतर कापतात तर विवेकाने चालणारे ध्येय गाठतात' मात्र त्यासाठी समतोल आचार विचाराची शिदोरी बांधावी लागते अशा या शिदोरीच्या बळावरच ती वाटचाल अर्थपूर्ण होते तद्वतच वीराचार्य पतसंस्थेची वाटचाल अर्थपूर्ण होताना दिसते आहे, अक्षय तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर निर्माणाधिन वास्तूच्या पायाभरणी प्रसंगीच्या आनंदोत्सवात संस्था वाटचालीतील विकास, वृद्धी, गती, प्रगतीचे, साक्षीदार, भागीदार, शिल्पकार ठरणाऱ्या आपणांसर्व सदस्य, ग्राहक, मार्गदर्शक, हितचिंतकांना सहभागी करून घेऊन आमचा आनंद द्विगुणीत करीत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्य सहयोग शुभेच्छा मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या स्नेह विश्वास समर्थनाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. 

या स्मृती इमारतीसाठी मा. आशिष चिंचवाडे आर्किटेक्ट म्हणून काम पहात असून श्री. सम्मेद हवाणे यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे. या समारभांसाठी दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, संस्थेचे चअरमन श्री. अजितकुमार भंडे, व्हा. चेअरमन श्री. अरूण पाटील, सर्व संचालक सल्लागार सदस्य व व्यवस्थापक शितल मसुटगे यांचेसह सर्व अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.