yuva MAharashtra तिरंगा पदयात्रेतून सांगली काँग्रेस व राष्ट्रप्रेमी नागरिकांचा सहिष्णुतेचा जागर आणि देशभक्तीचा माहोल !

तिरंगा पदयात्रेतून सांगली काँग्रेस व राष्ट्रप्रेमी नागरिकांचा सहिष्णुतेचा जागर आणि देशभक्तीचा माहोल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ मे २०२५

काश्मीरमध्ये पहलगाम येथील पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात शत्रूच्या घरात घुसून पाकपुरस्कृत दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत करुन पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय शौर्याला सलाम व शहीद सैनिक आणि अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करत बुधवारी सांगली शहर जिल्हा व ग्रामीण काँग्रेसतर्फे शहरातील हुतात्मा स्मारक ते महात्मा गांधी पुतळा अशी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय सैन्याचा विजय असो’ जय जवान जय किसान, शहीद जवान अमर रहे, जय हिंद अशा घोषणांनी सांगली दणाणून गेली. या पदयात्रेत हजारो राष्ट्रप्रेमी काँग्रेस कार्यकर्ते व सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दाखवलेल्या पराक्रमाबद्दल देशभरात राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी (दहशतवाद विरोधी दिन) ठिकठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे तिरंगा पदयात्रांचे आयोजन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सांगली काँग्रेसतर्फे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 


हुतात्मा स्मारकाला खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील व विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन दोन मिनिटे स्तब्धता पाळून शहिदांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील,ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मार्केट यार्ड समोरच्या हुतात्मा स्मारकापासून तिरंगा पदयात्रेला सुरूवात झाली.

तिरंगा यात्रेत अग्रभागी भारतीय तिरंगा डौलाने फडकत होता. काँग्रेस भवनासमोर स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तिरंगा पदयात्रेची 'हुतात्मा स्मारक - कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा -सिव्हिल हाॅस्पिटल- राममंदिर-काँग्रेस भवन - आझाद चौक मार्गे म. गांधी पुतळ्याजवळ सभेची सांगता झाली . 

सांगता सभेत खासदार विशाल पाटील म्हणाले,' आपण युध्दभूमीपासून लांब आहोत पण सैनिकांचा जीव धोक्यात असतो. आपण त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत. सैनिकांचे अभिनंदन व शहीदांना श्रध्दांजली अर्पण करतो.' 

माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी हे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. भारत कोणासमोर झुकत नाही हे दाखवून दिले. भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी देशभरात काँग्रेस पक्षातर्फे आज दहशतवाद विरोधी दिनी (राजीव गांधी स्मृतीदिन) तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शौर्य गाजवलेल्या सेनेचे अभिनंदन आणि शहीद नागरिक व सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या तिरंगा यात्रेने सांगलीतील नागरिकांनी एकजुटीचा संदेश दिला आहे. 
 
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी यांनी दहशतवाद मोडून काढला. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देताना दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल सांगलीकर नागरिकांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन करु या व आपण कायम त्यांच्या सोबत आहोत अशी ग्वाही देऊ या. सैनिकांच्या बलिदानामुळे आपण सुरक्षित आहोत. भारतीय भगिनींचे कुंकू पुसले गेले त्याचा बदला भारतीय सैन्याने घेतला आहे. अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या व ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबीयांना केंद्र शासनाने व काश्मीर सरकारने नोकरी द्यावी व आर्थिक मदत करावी. भारतीय लष्कराने तू बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्थान हे दाखवून दिले आहे. कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमित सिंह यांच्या पराक्रमाचा आम्हाला अभिमान आहे. 

माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, 'शौर्य गाजवलेल्या सैनिकांचे अभिनंदन करुन शहीदांच्या स्मृतीस उजाळा देताना त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक बळ देण्यासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे. अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला पाहिजे.

युवानेते डॉ. जितेशभय्या कदम यांनीही यावेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या. 

याप्रसंगी अय्याजभाई नायकवडी, करीमभाई मेस्त्री, डॉ. सिकंदर जमादार, मयूर पाटील, नंदकुमार शेळके, सुभाष खोत, तौफिक शिकलगार, इलाई बारूदवाले,अजिजभाई मेस्त्री, रविंद्र वळवडे, सचिन चव्हाण, अल्ताफ पेंढारी, मौला वंटमुरे,पैगंबर शेख डॉ. संजय पाटील,बिपीन कदम, प्रा. एन.डी.बिरनाळे, अजित ढोले, पैगंबर शेख, सनी धोतरे, मंगेश चव्हाण, बाबासाहेब कोडग, आण्णासाहेब कोरे, सुजयनाना शिंदे, प्रमोद व उत्तम सुर्यवंशी, राजेंद्र शिंदे इस्लामपूर, संतोष भोसले, सुनिल शिंदे, विश्वास पाटील, रविंद्र पाटील शिराळा, महादेव पाटील तासगाव, संजय हजारे (कवठेमहांकाळ), जयदीप भोसले वकील, रामभाऊ पाटील, आनंदराव पाटील, अमित शहा, उत्तम लाड, अजित शिरगावकर, अशोकसिंग रजपूत, स्वा. सैनिक रामराव पवार, मयूर पाटील, संभाजी पाटील बेडग, अमित पारेकर, श्रीधर बारटक्के, अरुण पळसुले, वसिम रोहीले, आशिष कोरी, प्रशांत देशमुख, अजित भांबुरे, सौ. मालन मोहिते, विजय नवले, अरविंद जैनापुरे, पैगंबर शेख, प्रशांत देशमुख, जितेंद्र पाटील, शामसिंग परदेशी, विश्वास यादव, विकास पाटील, इसाक मुल्ला, विकास पाटील, विश्वास माने, जयदीप जाधव, अख्तर मुजावर, राहुल पाटील, राजेंद्र कांबळे, विठ्ठलराव काळे, रघुनाथ नार्वेकर, देशभूषण पाटील, प्रतिक्षा काळे, कांचन तुपे, दीक्षितकुमार व भारती भगत, जन्नत नायकवडी, श्री मगदूम व महावीर पाटील धामणी, तुकाराम माळीजत, आयुब निशाणदार, आशिष चौधरी, प्रशांत अहिवळे, प्रकाश जाधव कडेगाव, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा व शहर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सांगलीकर राष्ट्रप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.