| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ मे २०२५
मा सत्यम गांधी आयुक्त भा प्र से यांनी पदभार स्वीकारल्या नंतर तक्रार निवारण आणि नागरिक संवाद या बाबत सर्व अधिकारी यांनी दक्ष राहणे बाबत सूचित करून स्वतः तक्रारीवर सुनावणी घेत असल्याने नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आज अखेर यामध्ये सातत्य ठेवल्याने नागरिकांनी या मध्ये आवश्यक त्या मुद्दा बाबत तक्रारी दाखल करत आहे.
४१ तक्रारी दाखल करण्यात आला आहेत. आरोग्य, स्वच्छता पाणी पुरवठा, जलनिसरण, नगररचना इत्यादी बाबत तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. त्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकाच्या तक्रारींवर सुनावणी होऊन निर्णय घेण्यात येत आहेत.
बुधवार या दिवशी प्रभाग समिती निहाय देखील नागरिकाच्या तक्रारी बाबत नागरी संवाद घेतला जाणार आहे,