| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ एप्रिल २०२५
शहरातील दिव्यांगांच्या सर्वेक्षणाला सुरुवात दिनांक १६ एप्रिल रोजी होणार असून हे सव्र्व्हेक्षण दिनांक १६ ते २३ एप्रिल या दरम्यान होणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांच्या घरी येऊन आशा, - छच् मार्फत सर्वेक्षणाचे फॉर्म भरले जाणार आहेत. या कालावधीमध्ये जर कोणत्याही दिव्यांगाच्या घरी सर्वेसाठी कोणी आले नाही तर त्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क करावा. तसेच सर्वेक्षणासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या आरोग्य सेविका व आशा यांना सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केले आहे.
काल दि ११/४/२०२५ रोजी डॉ वसंतदादा पाटील सभागृहात आशा वर्कर, छच् डॉक्टर यांचे दिव्यांग सक्षमीकरण अभियान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्या मध्ये मा रविकांत अडसूळ आयुक्त यांनी मार्गदर्शन केले आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी १०० दिवसाच्या उपक्रमांमध्ये दिलेल्या निर्देशानुसार नाविन्यपुर्ण उपक्रमांतर्गत दिनांक ०१ एप्रिल २०२५ पासून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे .
केंद्र शासनाचा निः समर्थ (दिव्यांग) व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ (The Rights of Persons With Disabilities ct, २०१६) नुसार २१ अपंगत्वाचा समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तीना दारिद्य निर्मुलन योजनेंतर्गत किमान ५% निधी राखीव ठेवण्यात येत आहे. त्यानुसार दिव्यांगासाठी राखीव निधी खर्च करणेबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार दिव्यांग बांधवांसाठी निधीची तरतूद करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबविण्याचे निश्चित झाले आहे. सदर अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी कालबद्ध नियोजन करून कार्यवाही करण्यात येत आहे. ४ टप्प्यात अभियान अमंलबजावणी करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात मनपा हद्दीत सर्व्हे करून नोंदणी व संगणकीकरणं होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अपंगत्व प्रमाणपत्र नसणाऱ्या लाभार्थ्यांना तपासणी करण्यात येणार आहे, प्रमाणपत्रे देण्याचे नियोजन केले आहे तिसऱ्या टप्प्यात उपकरणे उपलब्ध करून देणे कँम लावणे, चौथा टप्प्यात आरोग्य तपासणी, उपचार, णऊखऊ कार्ड , शासकीय योजना मेळावा, इत्यादी होणार आहे, या अभियानात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांगाची नोंदणी करणे, त्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि अरिजि विषयक संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे अपंगत्वावर मात करण्याचा प्रयन्त करणे हा या अभियानाच्या मुख्य उद्देश आहे, तरी नागरिकांनी जास्तीत जास्त सदर अभियान बाबत प्रसिध्द करून दिव्यांगांना लाभमिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मा रविकांत अडसूळ आयुक्त यांनी केले आहे.