| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २४ एप्रिल २०२५
मिरजकर नाल्यावरील बंधा-याचे काम पावसाळ्यापूर्व करून घेणार, तसेच मिरज भाजी मंडई, हा विषय महत्वाचे आहेत, या कामी सत्वर निर्णय घेण्याचा दृष्टीने विभागाची बैठक घेऊन तोडगा काढणार, असे प्रतिपादन सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका मिरज विभागीय कार्यालय कडील प्रलंबित कामाबाबत आढावा मा सत्यम गांधी यांनी घेत असताना प्रलंबित प्रकरणी लक्ष केंद्रित केले आहे,
काल मिरजकर नाला, भाजी मंडई यांची पाहणी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उप आयुक्त विजया यादव यांच्या समवेत केली. या बाबत तातडीने नगररचना आणि शहर अभियंता विभाग यांची बैठक आयोजित करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे असे सूचित केले आहे.
भाजी मंडई बाबत मनपा वतीने खर्च केला आहे, तथापि भाजी मंडई अद्याप चालू झालेली नाही, या बाबत मा आयुक्त यांनी समक्ष पाहणी केली. यावेळेस आयुक्त सतय्म गांधी यांना अभियंता चव्हाण, नगररचना विभाग कडील पंकजा रुईकर शाखा अभियंता यांनी सविस्तर माहिती दिली. सहा आयुक्त अनिस मुल्ला , मालमता अधीक्षक धनंजय हर्षद, बांधकाम विभाग कडील कर्मचारी उपस्थित होते.