yuva MAharashtra नागरिकाच्या तक्रारी निवारण ही प्रशासकीय प्राथमिकता; चैत्रबन नाला कामाच्या पाहणीप्रसंगी आयुक्त सत्यम गांधी यांचे प्रतिपादन !

नागरिकाच्या तक्रारी निवारण ही प्रशासकीय प्राथमिकता; चैत्रबन नाला कामाच्या पाहणीप्रसंगी आयुक्त सत्यम गांधी यांचे प्रतिपादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ एप्रिल २०२५

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी नागरिकाच्या तक्रारी नुसार आज सुट्टीचा दिवस असतानाही चैत्रबन नाल्याच्या कामाची पाहणी केली. नागरिकाच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी शहर अभियंता, शाखा अभियंता यांच्या समवेत आयुक्तांनी जागेवर जाऊन नाला च्या स्थिती बाबत पाहणी करून माहिती घेतली , 

दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये सदर चैत्रबन नाला पात्राबाहेर पडून नागरिकांच्या घरात पाणी शिरत असते. या कारणाने कायम उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नाल्याचे बांधकाम आरसीसी करण्याचे नियोजन सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी केले होते. आयुक्त सत्यम गांधी यांनी आज पाहणी करून अधिकाऱ्यांसह कॉन्ट्रॅक्टरला पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


यावेळी माजी नगरसेवक विष्णू माने, सचिनभाऊ कदम, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, शाखा अभियंता महेश मदने, वरिष्ठ स्वच्छता निरी उपस्थित होते.