yuva MAharashtra एका तक्रारीत निराकरण झाले पाहिजे; आयुक्त सत्यम गांधी यांचा प्रशासनाला आदेश; नागरिकांशीही संवाद !

एका तक्रारीत निराकरण झाले पाहिजे; आयुक्त सत्यम गांधी यांचा प्रशासनाला आदेश; नागरिकांशीही संवाद !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ एप्रिल २०२५

एका तक्रारीत तक्रारदाराचे निराकरण झाले पाहिजे, असे आदेश नवे आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रशासनाला दिले आहे. त्यांनी आज नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. काल दुपारी आयुक्त सत्यम गांधी यांनी डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात नागरिक संवाद, तक्रार निवारण मोहीम आयोजित करण्यात आली होती. सदर मोहिमेत नागरिक व सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. साधारणपणे आज ३३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये नगररचना, बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, जलनिसरण, विभागाकडील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्व तक्रारदारांना थोडक्यत म्हणणे मांडावे, असे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी खाते प्रमुखांना समक्ष जागेवर जाऊन परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना करण्याबाबत सत्वर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.