| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० एप्रिल २०२५
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रात राबविण्यात येत आहे.
बुधवार एक दिवस प्रभाग निहाय तर एक गुरुवार मनपा स्तरावर मा आयुक्त स्वतः घेणार आहेत. काल प्रभाग समिती क्र २ मध्ये उप आयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ प्रज्ञा त्रिभुवन सहा आयुक्त यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम २५ तक्रारी प्राप्त झाला होता त्यावर निर्णय घेतला आहे. सबधितांना सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य, स्वच्छता, बांधकाम, नगररचना विभागाशी संबंधित तक्रारी उपस्थितीत केल्या आहेत.
प्रभाग समिती क्र ३ मध्ये उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम राबविण्यात येत आहे.
काल तक्रारदार यांच्या अर्जावरून नगररचना विभाग कडील मागील प्रकरणी पूर्तता केली नाही, हे निदर्शनास आले. नगररचना विभागकडील संबंधित गैरहजर होते.अधिक माहिती घेता नगररचना विभागकडील शाखा अभियंता आजम जमादार हे विनापरवाना गैर हजर असल्याचे निदर्शनास आल्याने उप आयुक्त स्मृती पाटील यांनी श्री जमादार यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यासाठी सूचना सहा आयुक्त दिल्या आहेत. काल ६ तक्रारी प्राप्त झाला होता. मागील २ तक्रारी होत्या ४ बाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
मा रविकांत अडसूळ आयुक्त यांनी मिरज विभागीय कार्यालय येथे उपस्थित राहून नागरिक संवाद, तक्रार निवारण मोहीमेत सहभागी झाले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रभाग समिती क्र ४ मध्ये उप आयुक्त विजया यादव यांच्या व अनिस मुल्ला सहा आयुक्त,नगर अभियंता वैभव वाघमारे यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम १६ तक्रारी प्राप्त झाला, तसेच मागील ४अश्या एकूण २० तक्रारींवर आज सुनावणी झाली आहे . त्यावर निर्णय घेतला आहे. संबंधितांना सूचना दिल्या आहेत. स्वच्छता,आरोग्य ,छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ,नगररचना इत्यादी विभागकडील तक्रारी उपस्थितीत झाल्या आहेत. नागरिकाच्या तक्रारी बाबत मा आयुक्त रविकांत अडसूळ यांनी देखील उत्तर देऊन नागरिकाचे समाधान केले आहे.