| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ मे २०२५
गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून भारतावर केलेल्या हवाई हल्ल्याचा भारतीय सैन्याने अतिशय तीव्र आणि अचूक प्रत्युत्तर दिले. रात्री 8.55 च्या सुमारास जम्मू आणि पठाणकोट भागात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर केवळ तीन तासांत भारताने आक्रमक कारवाई करत शेजारील देशाला पूर्णतः गारद केले.
भारताच्या प्रगत एअर डिफेन्स यंत्रणांनी आणि अँटी-एअरक्राफ्ट गन्सने पाकिस्तानच्या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांना निष्फळ ठरवले. एस-400 प्रणालीने 50 क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट केली. याशिवाय एफ-16 आणि जेएफ-17 सारखी पाकिस्तानची अत्याधुनिक लढाऊ विमानेही भारताच्या कृतीसमोर निष्प्रभ ठरली.
यानंतर भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी समन्वय साधून पाकिस्तानवर जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय वायूदलाने इस्लामाबाद, लाहोर, क्वेटा यासह 15 शहरांवर निशाणा साधत तुफान बॉम्बहल्ले केले. नौदलाने आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरच्या साहाय्याने कराची बंदर उद्ध्वस्त केले. तर भूदलाने सीमारेषेवरून पाकिस्तानी चौक्यांवर आक्रमक कारवाई केली.
दरम्यान, बलोचिस्तानमध्ये बलोच लढवय्यांनी पाकिस्तानविरोधात उठाव करत सैन्य तळांवर आणि फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयावर हल्ले चढवले. या अंतर्गत गोळीबार आणि बॉम्बस्फोटांच्या घटनांमुळे पाकिस्तानची स्थिती आणखीनच बिघडली.
भारतीय वायूदलाच्या कारवाया इस्लामाबादमध्ये सुरू असताना, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट झाल्याने त्यांना सुरक्षित बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला. पाकिस्तानमध्ये लष्कर आणि प्रशासनामध्ये अंतर्गत मतभेद चिघळल्याचे वृत्त आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर भारतावर हल्ल्याचा आदेश देणारे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी शमशाद मिर्झा यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.