yuva MAharashtra वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्था समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी उपयोगी - जिनसेन भट्टारक

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्था समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी उपयोगी - जिनसेन भट्टारक


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ एप्रिल २०२५

प्रथितयश वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेने समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करून त्यांना अर्थसहाय्य, गरजूंना मदत, आवश्यक सहकार्य, करून त्यांना उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे वीराचार्य पतसंस्था समाजातील प्रत्येक घटकांसाठी उपयोगी आहे असे गौरवोद्वार जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी संस्थेच्या २६ व्या शाखा विश्रामबाग सांगली उद्घाटन प्रसंगी काढले. 

प्रथमतः संस्थेच्या सुसज्ज, अद्ययावत दालनाचे उ‌द्घाटन पुज्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते झाले. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. भालचंद्र पाटील, चेअरमन श्री. रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव श्री. शशिकांत राजोबा यांनी श्रीफळ वाढवून शाखेच्या प्रशस्त सेवा दालनाचा शुभारंभ केला. यावेळी शाखेमधील विविध अत्याधुनिक सेवा सुविधांचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते संपन्न झाले. 

यावेळी उपस्थितांचे स्वागत शाखा संचालक मा. जे. जे. पाटील यांनी केले. प्रास्ताविकामध्ये चेअरमन श्री. अजितकुमार भंडे यांनी संस्थेच्या मार्च २०२५ अखेर प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी संस्था ७६२ कोटीचा व्यवसाय करून ९८ % कर्जवसुलीसह सतत शुन्य टक्के एन पी ए ठेवणारी संस्था असा लौकिक प्राप्त संस्था झाली असल्याचे नमुद केले. यानंतर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून श्री. शशिकांत राजोबा यांनी सहकारी संस्थांच्या आयकरासारख्या समस्या निराकरणासाठी मा. क्रेद्रीय अर्थराज्यमंत्री यांची भेट घेवून म्हणणे सादर केल्याचे सांगितले. वीराचार्य पतसंस्थेच्या माध्यमातून ग्राहकांना अर्थसाक्षर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. 


मा. रावसाहेब पाटील यांनी चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या मागे समाज उभा राहून त्यांना पाठबळ देतो आणि म्हणूनच वीराचार्य पतसंस्था सतत प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमुद केले. 

डॉ. अजित पाटील यांनी वीराचार्यांच्या विचाराचा वारसा जपत संस्था मार्गक्रमण करीत असून संस्थेस सर्व सभासद ग्राहकांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले, महास्वामीनी आर्थिक संस्था समाजोपयोगी कार्य करून समाजाचा विकास साधू शकतात हा विश्वास वीराचार्य ने सार्थ ठरविले असलेचे गौरवोद्‌गार काढले. विश्वास या शब्दातील वी हा वीराचार्यांचा आहे त्यामुळे विश्वासाचे नांव वीराचार्य आहे असे ही त्यांनी नमुद केले. 

मा. भालचंद्र पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये वीराचार्य पतसंस्था विकास वृध्दिमध्ये अग्रेसर असून त्यांनी समाजाचा आधार प्राप्त केला असून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ हा मंत्र जपत सहकारात दिशादर्शक काम संस्था करीत असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाचे आभार संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. अरूण आण्णा पाटील यांनी मानले. यावेळी मा. ॲड. उल्हास चिपरे, मा. सुरेश जिनगोंडा पाटील, सांगलीतील अनेक प्रतिष्ठित नागरीक बंधू भगिनी यासह संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार सदस्य, व्यवस्थापक श्री. शितल मसुटगे यांचेसह सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.