| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ एप्रिल २०२५
मग मुख्यमंत्री महोदय शंभर दिवस उपक्रम अंतर्गत नागरिक असे संवाद व तक्रारी निवारण मोहीम हा नवा उपक्रम मा. रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या संकल्पनेतून मनपा क्षेत्रात राबविण्यात येत असून सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 43 तक्रारी दाखल करून सहभाग नोंदवला आहे. साधारणपणे आरोग्य, नगर रचना, बागा विभाग, जन्म मृत्यू, बांधकाम विभाग इत्यादी विभागाचे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संबंधित अधिकारी यांना तक्रारीचे अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना आज देण्यात आलेले आहेत.
त्याचबरोबर नागरिक संवाद तक्रार निवारण मोहिमेअंतर्गत अधिकारी कर्मचारी बरोबर नियंत्रण अधिकारी म्हणून उप आयुक्त वैभव साबळे, स्मृती पाटील, शिल्पा दरेकर यांनी तक्रारी ऐकून घेतला आहेत.
मा आयुक्त यांनी नागरिकांच्या तक्रारीवर अधिकारी वर्गाने सत्वर कारवाई करणे व केल्या कारवाईबाबत संबंधित कळवण्याची जबाबदारी निश्चित केली. या उपक्रमाने नागरिकां मध्ये तक्रारी निवारण होत असल्याने विश्वास निर्माण झाला आहे .
या तक्रार निवारण कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक यांची संख्या जास्त होती. त्यांनी देखील तक्रारीमध्ये त्याच्या समस्या मांडून निराकरण करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
रामचंद्र जाधव जेष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते यांची तक्रार उप आयुक्त श्री साबळे यांनी त्याच्याजवळ बसून ऐकून घेतली आहे. त्या बदल श्री जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे, समाज सेवक मनोज भिसे यांनी देखील आज तक्रार निवारण मोहीम मध्ये तक्रार नोंदवून सहभाग नोंदवला आहे,
वारंवार तक्रारी होऊ नये या करिता संगणकीय नोंदी करण्यात येणार आहे, त्याच बरोबर व्हाट्सअप्प व्दारे देखील तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती मा आयुक्त यांनी दिली आहे.