| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १४ एप्रिल २०२५
सांगलीतील १९२ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेहीच्या मिरज शाखेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत 'गीत रामायण' हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम बालगंधर्व नाटचमंदिरात उत्साहात पार पडला.
गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या उत्स्फुर्त लेखणीतून साकारलेले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीताने गीत रामायण अजरामर झाले आहे. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कीर्तनकार हृषीकेश बोडस आणि सुप्रसिद्ध डॉ.जी. एस. कुलकर्णी, पौएनजीचे संचालक आमदार सुधीर गाडगीळ, राजीव गाडगीळ, सौ. मंजिरी गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वरवैभव क्रिएशन्स, सांगली यांच्या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला.
श्रीरंग जोशी, सुकृत ताम्हनकर, कीर्ती पेठे या गायकांनी गीत रामायणातील एक एक गाणी सादर करताना प्रेक्षक भारावून जात होते. स्वये श्री राम प्रभु, राम जन्मला ग सखे, स्वयंबर
झाले सीतेचे, माता न तू वैरिणी अशा विविध गाण्यांनी कार्यक्रमांत रंगत आणली. त्यांना भास्कर पेठे, प्रशांत भाटे, परेश पेठे, कृष्णा साठे, अक्षय कुलकर्णी यांनी संगीत साथ केली. कार्यक्र माचे निवेदन शशांक लिमये यांनी केले तर परेश पेठे हे या कार्यक्रमाचे संगीत संयोजक व निर्माता होते. यावेळी सरव्यवस्थापिका शुभांगी कुलकर्णी, मिरज शाखा व्यवस्थापक प्रदीप पुराणिक, अभिषेक प्रभुदेसाई मार्केटिंग विभाग हेड प्रशांत आरवळी, महेंद्र कालेकर यांच्यासह शाखेचा स्टाफ उपस्थित होता.